दोन्ही मूत्रपिंडे अचानक बंद पडणे हा प्रकार काही विशिस्त प्रसंगी होऊ शकतो. खूप रक्तस्त्राव, जुलाब-कॉलेरा यामुळे शोष पडून रक्तपरवाह कमी होणे, रक्तदाब खूप कमी होऊन मूत्रपिंडाचा रक्तपुरवठा थांबणे, भाजलेले रुग्ण, विषबाधा, मूत्र-पिंड सूज, शस्त्रक्रिया, शरीरात मोठी जंतुडओष (सेप्सिस) आदि. असे काही झाले तर हा आजार-अपघात संभवतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाल असे होऊ शकते. हा प्रकार लगेच उपचार झाल्यास दुरुस्त होऊ शकतो. फक्त नातेवाईक, डॉक्टर यांनी तो वेळीच ओळखला पाहिजे. याची प्रमुख खूण म्हणजे लघवी न होणे. दम लागणे, शिवाय त्या त्या आजाराची लक्षण-चिन्हे देखील असतात. रक्त तपासणीत क्रिएटिनिन वाढलेले दिसते. यावर ताबडतोब रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, वेळ घालवू नये.
आठवडे/ महीने दीर्घकाळ चालणारा मूत्रपिंडविकार उपचाराने दुरुस्त होतो किंवा कायम राहू शकतो. मूत्रपिंडविकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे 10000 रुग्ण या आजाराने दगावतात, कारण निदान उशिरा होते आणि मूत्रपिंड-रोपणाचा आवश्यक उपचार आपल्या गरजेपेक्षा फार कमी उपलब्ध आहे. फक्त 10% रुग्णांना हा उपचार मिळू शकतो ही वस्तुस्थिती आहे. हा विकार पुढे दिल्याप्रमाणे महाराष्ट्रात अनेक भागात/समूहात जास्त दिसून येतो:
बऱ्याच रुग्णाना (50%) याची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत . इतराना खालील पैकी लक्षणे आणि चिन्हे दिसतात .
लघवी कमी होण्याचा अर्थ अस, की मूत्रपिंडाचे काम मंदावत आहे.
ह्या रोगांचे तज्ज्ञांकरवीच निदान व उपचार होणे आवश्यक आहे. मात्र वेळीच शंका घेणे व योग्य डॉक्टरकडे पाठवणे एवढे मात्र आपण करू शकतो. शरीरावर सूज असलेल्या रुग्णाला लघवीचे प्रमाण विचारा. हे प्रमाण कमी आढळल्यास ताबडतोब डॉक्टरकडे पाठवणे आवश्यक आहे. खरे म्हणजे शरीरावर सूज असेल तर बहुधा गंभीर आजार असतोच.
मूत्रपिंडावरचे उपचार गुंतागुंतीचे आणि दीर्घकाळ चालणारे असतात. त्यात येणारे यश मर्यादित असते. बिघडलेल्या मूत्रपिंडावर जास्त ताण येऊ नये म्हणून खाण्यापिण्यावर अनेक नियंत्रणे येतात. मीठ-पाण्याचे प्रमाण कमी करणे व इतर औषधोपचार हाच मुख्य उपाय असतो. यासाठी लघवीचे प्रमाण लक्षात घ्यावे लागते. कधीकधी कृत्रिम डायलिसीस करावे लागते. डायलिसीस म्हणजे रक्तातून टाकाऊ पदार्थ गळून काढून टाकण्यासाठी कृत्रिम व्यवस्था असते.
डायलिसीसमुळे मूत्रपिंडे बंद पडलेल्या रुग्णांना जीवनदान मिळालेले आहे. मूत्रपिंडाचा आजार तात्पुरता असेल तर डायलिसीस नंतर बंद करता येते. मात्र कायमच्या आजारात डायलिसीस नियमितपणे करावे लागते.
डायलिसीस म्हणजे मूत्रपिंडाचे काम कृत्रिमरित्या करणे. म्हणजे रक्तातील युरिया, इ. पदार्थ धऊन टाकणे. यासाठी वेगवेगळी तंत्रे उपलब्ध आहेत.
पेरिटोनियल (पोटाचे) डायलिसीस – पोटात आतडयांवर सर्वत्र एक सूक्ष्म पदर असतो. याचा वापर करून रक्तातले नको असलेले काही पदार्थ बाहेर आणता येतात. यासाठी पोटाच्या या आवरणात द्रवपदार्थ 20-30 मिनिटे सोडला जातो. रक्तातले काही पदार्थ भौतिकशास्त्राच्या नियमानुसार या द्रवात येतात. मग हा द्रव काढून टाकला जातो. यानंतर ही प्रक्रिया काही वेळा परत परत केली जाते. कोणत्याही छोटया रुग्णालयात हा उपचार करता येतो. त्यात काही धोका असतो पण योग्य प्रशिक्षणाने तो कमी होतो. नवीन तंत्रे उपलब्ध झाल्याने हे तंत्र थोडे मागे पडले आहे.
रुग्णालयापासून दूर राहणाऱ्या रुग्णांना याचा विशेष उपयोग आहे. यासाठी एक टेफ्लॉन नळी कायमची पोटाच्या पोकळीत बसवली जाते. यात 2 लिटर द्रवपदार्थ सोडतात आणि 6 तासांनी तो काढून घेतात. यानंतर परत ताजा द्रवपदार्थ भरला जातो व परत 6 तासांनी काढला जातो. ही प्रक्रिया परत परत केली जाते. 24 तासांत 4 वेळा असे करतात. रोजच ही प्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्ण आपले बाकीचे कार्यक्रम ठरवून पार पाडू शकतो. कधीकधी यात पोटात जंतुदोष होऊ शकतो. या उपचाराचा मासिक खर्च रु. 15-25000 पर्यंत जाऊ शकतो.
यामध्ये रक्ताचा प्रवाह बाहेर आणून एका यंत्रात फिरवला जातो. याच यंत्रात दुसऱ्या बाजूला एक द्रवपदार्थ फिरत असतो. रक्त व द्रव एकमेकात मिसळू शकत नाहीत, कारण त्यात एक आधी पातळ पडदा बसवलेला असतो. रक्तातील काही पदार्थ या पडद्यातून द्रवात उतरतात.
हल्ली रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक संगणकयुक्त डायलिसीस मशिन्स उपलब्ध असतात. प्रत्येक रुग्णाला योग्य असे सेटिंग त्यात करता येते. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सर्व गरजू रउगणणा मोफत डायलिसिस सेवा उपलब्ध आहे. आठवड्यातून दोन वेळ डायलिसिस करावे लागते.
डायलिसीस यंत्र म्हणजे एक कृत्रिम मूत्रपिंड असते. यात आता खूप सुधारणा झाल्या आहेत. तरीही त्यात धोके व दुष्परिणाम असू शकतात. याचा मासिक खर्चही बराच असतो. म्हणूनच ज्यांना शक्य आहे असे रुग्ण मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया करून घेतात.
एकाच व्यक्ति गरजेप्रमाणे आणि सोयीपरमाणे एक किंवा दोन्ही पद्धतीने डायालिसीस करू शकते, यासाठी जिल्हा रुग्णालयात मार्गदर्शन उपलब्ध आहे.
प्रस्तावना
मानवी शरीरातील मूत्रपिंड (किडनी) हे अत्यंत महत्त्वाचे अवयव आहेत. त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे रक्तातील अपायकारक पदार्थ (waste products) आणि अतिरिक्त पाणी फिल्टर करून शरीरातून मूत्राच्या स्वरूपात बाहेर टाकणे.
जेव्हा मूत्रपिंडाचे कार्य ८५–९०% पेक्षा अधिक कमी होते, तेव्हा शरीरात विषारी पदार्थ साठू लागतात. अशा स्थितीत “डायलिसिस (Dialysis)” ही उपचारपद्धती रुग्णाचे जीवन टिकविण्यास मदत करते.
“डायलिसिस” म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि मीठ यांचे कृत्रिमरीत्या (artificially) काढून टाकणे. ही प्रक्रिया मूत्रपिंडाच्या कार्याचे काही अंशी प्रतिस्थापन (replacement) करते, परंतु मूत्रपिंड बरे करत नाही.
1. हेमोडायलिसिस (Hemodialysis)
2. पेरिटोनियल डायलिसिस (Peritoneal Dialysis)
डायलिसिस ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी जीवनरक्षक प्रक्रिया आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी योग्य तांत्रिक कौशल्यासोबत रुग्णाभिमुख (patient-centered) दृष्टी ठेवणे अत्यावश्यक आहे.
नियमित निरीक्षण, स्वच्छता, आणि रुग्ण शिक्षण यामुळे डायलिसिस उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी होतो.
काही जणांच्या बाबतीत यात निकामी मूत्रपिंडाऐवजी इतर निरोगी व्यक्तीचे मूत्रपिंड बसवण्याची शस्त्रक्रिया केली जाते. प्रत्येकाच्या शरीरात दोन मूत्रपिंडे असतात. त्यातले एखादे दिले तरी शरीराचे अडत नाही. मात्र या शस्त्रक्रिया अत्यंत खर्चीक आणि गुंतागुंतीच्या असतात.
डायलिसीसच्या ऐवजी ज्यांना शक्य आहे त्यांना मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया बरी पडते. याचा खर्च सध्या एकूण 5-10 लाखाच्या आसपास जातो. मूत्रपिंड दान करणारा योग्य दाताही भेटला पाहिजे. मूत्रपिंड-दाता हा रूग्णाचा रक्ताचा नातेवाईक असणे कायद्याने आवश्यक आहे. असा नातेवाईक नसल्यास शासनाकडून बऱ्याच प्रयत्नाने परवानगी मिळवावी लागते. मूत्रपिंडाचा काळा व्यापार व गुन्हेगारीचा काही प्रकार उघडकीस आल्याने यासंबंधी कायदा आहे. ब्रेनडेड झालेल्या रुग्णाकडून दोन मूत्रपिंडे दोन रुग्णाना उपयोगी पडू शकतात.
ज्याला मूत्रपिंड द्यायचे आहे, त्याची पूर्ण तपासणी केली जाते. त्याची स्वत:ची शारीरिक स्थिती निरोगी असायला पाहिजे. आपल्या देशात अजून मेंदू-मृत व्यक्तीचे मूत्रपिंड काढून बसवण्याची पध्दत सुरू झाली आहे. अपघातात किंवा आजाराने मेंदू निकामी झाला आहे असे रुग्ण रुग्णालयात असतात. योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे मूत्रपिंड काढता आल्यास बऱ्याच मूत्रपिंड गरजूंना जीवदान मिळू शकते. नुकत्याच मृत झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढताना मूत्रपिंड चांगल्या अवस्थेत पाहिजे. यासाठी ते लवकरात लवकर काढावे लागते आणि थंड राखावे लागते.
आयुर्वेदामध्ये मूत्रपिंडाच्या विकारांवर अनेक औषधोपचार सुचवले जातात. त्याबद्दल आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने संशोधन अजून तरी अपूर्ण आहे.